Higher Education

Higher Education

मुलांना परीक्षेच्या निकालाची चिंता सतावतेय? मग, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

PUBLISH DATE 21st May 2024

                                                                                                                                                                          Exam Result Anxiety

सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. आजकाल प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. या स्पर्धात्मक परिस्थितीत परीक्षा हा शब्द विदयार्थ्यांच्या मनात ताण-तणाव आणि चिंता निर्माण करतो. बरं हे केवळ महाविद्यालयीन किंवा विद्यापीठातील विद्यार्थ्यांपुरते मर्यादित नाही. शाळेतील मुलांना सुद्धा निकालाच्या दिवशी भीती वाटते.

२०२२ च्या NCERT च्या एका सर्वेक्षणानुसार अंदाजे ८०% टक्के विद्यार्थी परीक्षा आणि निकालाच्या चिंतेमुळे ग्रस्त आहेत. परीक्षेचा ताण ही सामान्य समस्या असली तरी याचा परिणाम सर्व शैक्षणिक प्रणालींमधील विद्यार्थ्यांवर होतो. या परिणामाची तीव्रता वेगवेगळी दिसू शकते.

जसे की, काही विद्यार्थ्यांसाठी मध्यम ताण हा प्रेरणादायी असू शकतो, तर काहींसाठी हा ताण नकारात्मक असू शकतो. आज महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, या निकालाची चिंता काही विद्यार्थ्यांच्या मनात असू शकते. या परीक्षा निकालांच्या चिंतेचे परिणाम एकूण मानसिक आरोग्यावर होतात. यापासून सुटका कशी करावी?  आणि या स्थितीत पालकांनी विद्यार्थ्यांची काळजी कशी घ्यावी? त्या संदर्भात तज्ज्ञ काय सांगतात? ते आपण जाणून घेणार आहोत.

मोकळा संवाद महत्वाचा

निकालाच्या चिंतेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात अस्वस्था आणि चिंता निर्माण होते. त्यामुळे, त्यांच्या वर्तनात बदल होऊ शकतो. त्यामुळे, अशा स्थितीमध्ये पालकांनी मुलांना समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी, पालक आणि शिक्षकांनी निकालाच्या परिणामांची काळजी न करता शांत आणि सकारात्मक राहणे आवश्यक आहे.

पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांनी मोकळा संवाद साधणे गरजेचे आहे. तसेच, परीक्षेच्या निकालाचा तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी केवळ निकालावरच नाही तर त्यांनी केलेला अभ्यास आणि त्यासाठीचे प्रयत्न यावरही लक्ष केंद्रित करावे. त्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे.

तुलना करू नका

अनेक पालकांना आपल्या मुलांच्या गुणांची तुलना ही इतर विद्यार्थ्यांसोबत करायची सवय असते. ही सवय सर्वात आधी सोडा. कारण, यामुळे तुमच्या मुलावर किंवा मुलीवर याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते, त्यामुळे, गुणांची तुलना अजिबात करू नका.

प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही टॅलेंट असते, तशीच कमतरता देखील असते. त्यामुळे, पालकांनी मुलांच्या या गोष्टी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे तुलना करू नये.

नकारात्मक विचारांची करा सुट्टी

परीक्षेच्या निकालाच्या दिवशी किंवा पूर्वी विद्यार्थ्यांच्या मनात निकालाबाबत नकारात्मक विचार येऊ शकतात. हे विचार दूर करण्यासाठी पालक आणि शिक्षक मुलांची मदत करू शकतात. जसे की, भविष्याबाबत अनावश्यक तर्क-वितर्क न करणे, निकालाबाबत कोणतेही अनुमान न लावणे. या स्थितीमध्ये पालक आणि शिक्षक मुलांना पाठिंबा देऊ शकतात आणि भविष्याबाबत सकारात्मक राहण्याचा सल्ला देऊ शकतात.

Register for Free Mock Test

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.