Board Exams

Board Exams

HSC Result 2025: बारावीच्या गुणपत्रिका आजपासून मिळणार

PUBLISH DATE 16th May 2025

HSC Result 2025 Maharashtra Board: राज्य मंडळाच्या बारावीच्या लेखी परीक्षेच्या ऑनलाइन निकालानंतर विद्यार्थ्यांना आज शुक्रवारी १६ मेपासून गुणपत्रिकांचे वाटप केले जाणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात येणार असून, तत्पूर्वी संबंधित महाविद्यालयांना दुपारी ११ वाजता गुणपत्रिका वितरित केल्या जातील, अशी माहिती राज्य मंडळाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली. बारावीचा निकाल पाच मे रोजी जाहीर झाला.

विद्यार्थ्यांना मंडळाच्या वेबसाइटवरून ऑनलाइन निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यानंतर आज शुक्रवारी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात येणार आहेत, अशी माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली. गुणपत्रिकांच्या आधारे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे सोयीचे ठरणार आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इ. १२ वी च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा एकूण ९१.८८% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक (९६.७४%) लागला आहे, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी (८९.४६%) आहे. नेहमीप्रमाणे यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, नियमित, खाजगी, पुनर्परिक्षार्थी आणि दिव्यांग अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याचा अर्थ ९१.८८% विद्यार्थी पास झाले आहेत. खाजगी विद्यार्थ्यांमध्ये ३६,१३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी २९,८९२ विद्यार्थी पास झाले आहेत. त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८३.७३% आहे.

जे विद्यार्थी पुन्हा परीक्षा देत होते, त्यांची संख्या ४२,३८८ होती. यापैकी फक्त १५,८२३ विद्यार्थी पास झाले आहेत. त्यामुळे त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५% आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल मात्र चांगला लागला आहे. ७,३१० दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, ज्यापैकी ६,७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३८% आहे. बोर्डाने दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमानुसार सवलतीचे गुण दिले आहेत.

यंदा एकाही विद्यार्थ्याला १०० टक्के गुण नाहीत -यावर्षी, एकाही विद्यार्थ्याला १००% गुण मिळालेले नाहीत. पण, १९२९ कॉलेजचा निकाल १००% लागला आहे. याचा अर्थ, त्या कॉलेजमधील सर्व विद्यार्थी पास झाले आहेत. ४५६२ कॉलेजचा निकाल ९० ते ९९.९९% लागला आहे, तर ३८ कॉलेजचा निकाल ०% लागला आहे. "एकूण १५४ विषयांपैकी ३७ विषयांचा निकाल १०० % आहे," असे बोर्डाने सांगितले.

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा.