11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

अकरावी प्रवेश प्रक्रियेत होणार मोठे बदल २०२०

PUBLISH DATE 24th June 2020

अकरावी प्रवेशासाठी नियमित फेऱ्या पार पडल्यानंतर 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या फेरीचे नियोजन केले जाते. मात्र कमी कालावधीत प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने यंदा ही फेरी रद्द करण्यात आली आहे.

कमीत कमी कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल, असे नियोजन करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात येईल, तसेच या फेऱ्यांना आरक्षण लागू नसेल, असे मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई महानगर परिक्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद येथे अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. दरवर्षी गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांनी अर्जात दिलेल्या कॉलेजांच्या प्राधान्यक्रमांनुसार नियमित प्रवेश फेऱ्या, त्यानंतर रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' तत्त्वावरील फेऱ्या आणि यानंतरही राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश फेऱ्या असे प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप असते. जूनमध्ये सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया वाढणाऱ्या प्रवेश फेऱ्या, विद्यार्थ्यांच्या तक्रारी यांमुळे ऑक्टोबरपर्यंतही लांबते. यंदा जुलैअखेरीस दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, पुढील दीड महिन्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव, लांबलेले शैक्षणिक वर्ष यामुळे प्रवेश प्रक्रिया लवकर संपवणे आवश्यक आहे. यंदा सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेचे माहिती पुस्तक उपलब्ध करून देणे, अर्ज भरणे यांपासून ते प्रवेश शुल्क भरणे ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार असून त्या अनुषंगाने प्रणालीत बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना कागदपत्रेही ऑनलाइन अपलोड करता येणार आहेत. मुंबई आणि पुणे महापालिकेच्या ज्युनिअर कॉलेजांतील ५० टक्के जागा या पालिकेच्या शाळेतून दहावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव राहणार आहेत. स्थानिक परिस्थिती, विद्यार्थ्यांना होणारे लाभ, या मुद्द्यांची तपासणी करून संचालकांनी याबाबत निर्णय घ्यायचा आहे.

आरक्षणातील बदल

 

  1. मागील वर्षी सामाजिक, शैक्षणिक मागास प्रवर्गाकरता (एसईबीसी) १६ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. यंदा शासन निर्णयानुसार हे प्रमाण १२ टक्के करण्यात आले.
  2. अपंग विद्यार्थ्यांसाठी तीन टक्के जागा राखीव होत्या. हे प्रमाण आता चार टक्के करण्यात आले आहे.

प्रवेश फेऱ्यांचे स्वरूप

  1. द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश शून्य फेरीत न करता नियमित फेरीत करण्यात येतील.
  2. नियमित फेऱ्यांनंतर आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेऱ्या होतील.
  3. विशेष फेऱ्यांतील प्रवेश आरक्षणाऐवजी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार होतील.
  4. नियमित फेऱ्यांमध्ये पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News